ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा 2022 काढलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. खरीप पिक विम्याचे 1200 कोटी रुपये खरीप पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांना खरीप पिक विमा 2022(Kharip Pik Vima 2022) चे दावे निकाली काढण्याचे आदेश दिलेले आहे.
मित्रांनो खरीप पिक विमा pik vima nuksan bharpai काढलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे वितरण करण्याचे आदेश महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेले असून विमाधारक ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम कंपनीकडे केलेले होते, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे सांगितले आहेत.
बाराशे कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई (pik nuksan bharpai maharashtra) आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा साठी पात्र झालेल्या आहेत. याविषयी सुद्धा माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. खरिपाच्या पीक विम्याच्या निधी वितरणा संबंधित मिळालेल्या या बातमीमुळे शेतकरी वर्गांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
महत्वाचं अपडेट : पाईप लाईन योजना 2022 अंतर्गत नवीन अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस आलेला होता त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान झालेले होते त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कापूस या दोन पिकांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक चीबडले होते, तसेच सोयाबीनच्या पिकाच्या उत्पन्नात सुद्धा घट झालेली असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पिक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्याचे सांगितले होते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी खरिपाचा पिक विमा काढलेला आहे अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने नुकसान भरपाई(Pik Vima Claim) चे दावे दाखल केलेले होते. त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन पिकांची पाहणी करून गेले.
तेव्हापासून शेतकरी पिक विमा कधी येईल याची वाट पाहत होते. अध्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नव्हती. त्यामुळे आता कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता महत्त्वपूर्ण असा आदेश पीक विमा कंपनीला दिलेला आहे. त्यामुळे खरीप पिक विमा बाराशे कोटी रुपये वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विम्याची रक्कम जमा करण्यास महाराष्ट्रातील विमा कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे.
एकूण पिक विमा मंजूर (Pik Vima Manjur Yadi) रक्कम ही 2148 कोटी रुपये आहे. आतापर्यंत 4 लाख 97 हजार 63 विमाधारक शेतकऱ्यांची सर्वेक्षण पूर्ण झालेली आहे. त्यापैकी 56 हजार 800 दावे आत्तापर्यंत निकाली काढण्यात आलेले असून. उर्वरित दावे निकाली काढण्याचे काम सुरू असून प्रलंबित दावे हे 71 हजार 822 आहेत. विमा कंपनीने अजून पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई दिलेली नसल्यामुळे कृषी विभागाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु आता उर्वरित दावे लवकर निकाली काढण्याचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई लवकर जमा करण्यात येणार आहे. Pik Vima Nidhi Vitarit
पिक विमा नुसार भरपाई वितरणासंबंधीची ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा, तुम्हाला पिक विमा मिळाला का हे कमेंट करून नक्की सांगा. पिक विमा संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या शंकांचे निरसन करू.