Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
थॉमस रॉबर्ट माल्थस (१७६६ - १८३४) हा इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक होता. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्याने लोकसंख्यावाढीचा सिद्धांत मांडताना दिला होता.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या 3 अवस्था आहे.
टप्पा 1
उच्च जन्मदर, मृत्यू दर आणि लोकसंख्या वाढीचा कमी दर द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा उच्च जन्म दर आणि उच्च मृत्यू दर द्वारे दर्शविले जाते. भारतामध्ये 1891-1921 या कालावधीत लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा अनुभवण्यात आला.
टप्पा 2
उच्च आणि स्थिर जन्मदर, झपाट्याने घटणारा मृत्यू दर आणि लोकसंख्येतील अतिशय जलद वाढ याद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. 1921 नंतर भारताने दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला.
टप्पा 3
लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्युदर यात खूप मोठा फरक पडत जातो तेव्हा तिसऱ्या टप्प्यात मृत्युदर आणखी कमी होत जातो. मात्र त्याच वेळेस जन्मदरही कमी होत जातो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो, लोकांचे उत्पन्न वाढते, त्यांचे राहणीमान उंचावते, तंत्रज्ञानाचा विस्तार होतो तेव्हाच शैक्षणिक पातळी उंचावते. द्वितीय व तृतीय व्यवसायाचा विस्तार होतो आणि लोकांनाही कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटल्यामुळे जन्मदर अजून कमी होत जातो. तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या भागात विकसनशील देशांचा विकसित देशाकडचा प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यांत महत्त्वाचा टप्पा असतो.